marathi shayari

New Marathi Shayari – मराठी शायरी – Attitude – Status > 2024

Hi, Friends Here you Can Read Best मराठी शायरी नवीन, Marathi Shayari, Marathi Shayari Love, गुलाब शायरी मराठी, Shayari Marathi Attitude, दु:ख शायरी मराठी, मराठी शायरी प्रेमाची, मराठी शायरी संग्रह, Good Morning Shayari Marathi, {Marathi Status}, Marathi Status Love, रॉयल मराठी स्टेटस, जिद्द स्टेटस मराठी, जीवनावर मराठी स्टेटस, Marathi Status On Life, Marathi Poems, Marathi Kavita, मराठी डीपी स्टेटस, मराठी स्टेटस जीवन. मराठी शायरी म्हणजे मराठी कविता. Marathi Shayari For Marathi Lovers. Marathi Shayari Attitude.

{1} Best Marathi Shayari

Marathi Shayari

“रुबाबदार नाक,
आकर्षक फिगर,
बोलके डोळे,
गोरे गोरे गाल,
चल फिरायला,
इन ऑरबिट मॉल.”

“5 वर्षांपासून आहे,
मी तुझ्यात मग्न,
30 March ला,
28 वर्षाची होशील तू,
मग 1 April ला,
करायचं का आपण लग्न?”

“स्वप्नात माझ्या येतेस,
पण खऱ्या आयुष्यात कधी आली नाही तू,
आठवण पण येत नाही तुला माझी,
करून देईल मी तुला मटकी ची भाजी,
मग Ali-bag ला जाऊ आपण खायला,
मच्छी ताजी ताजी.”

समजत नाही,
का तुला हौस आहे सिंगल रहायची,
एकटच इंस्टाग्राम मध्ये,
ऑन लाईन राहायची,
प्रेम करायची हिम्मत,
कधी तरी करून बघायची,
समजत नाही मला,
का वेळ येतेय,
हे तुला सांगायची.

marathi shayari

जॉब सुटल्यावर असतो का,
तुझ्याकडे वेळ?
जाऊ आपण जुहू बीच ला,
खायला सुखी भेळ.
एकदातरी लाव याचा ताळमेळ,
आणि दे मला,
तुझा अमूल्य वेळ.

गेली ७ वर्ष बघतोय तुझी मी वाट,
आता तर संपलीय कोरोना ची लाट,
बांध तू कोणाशी तरी प्रेमाची गाठ,
कदाचित दुबई चा मुलगा,
बघतोय तुझी वाट.

=========================
पुरुषाचे मन खोल पाण्यासारखे असते.
=========================
ध्येयावर राह तुम ठाम,
अपयश राहील,
तुझ्यापासून नेहमी लांब.
=========================

“प्रेम हे एक अनमोल धन आहे,
ज्याच्याकडे आहे तो धनवान आहे.
प्रेम हे एक देवदूत आहे,
ज्याला भेटला तो सुखी आहे.”

“प्रेम हे एक सुंदर फूल आहे,
ज्याला पाहिले ते मोहित झाले.
प्रेम हे एक सुंदर गीत आहे,
ज्याला ऐकले ते मंत्रमुग्ध झाले.”

“प्रेम हे एक अमूल्य रत्न आहे,
ज्याला मिळाले तो भाग्यवान आहे.
प्रेम हे एक महान शक्ती आहे,
ज्याने जगाला बदलले आहे.”

अर्थ :-
प्रेम हे एक अशी भावना आहे जी मानवी जीवनाला अर्थ देते. ते आनंद, दुःख, आशा आणि भय यासारख्या सर्व भावनांना व्यापते. प्रेम हे एक शक्तिशाली शक्ती आहे जी जगाला बदलू शकते.

Marathi Shayari
Marathi Shayari

एक पती,
शंभर यती.
=========================
पत्नीचा करतो मी आदर,
मी आता आहे,
एका मुलीचा फादर.
=========================


=========================
बायकोचा मळा,
घराचा पाला,
छपरी आहे,
माझा साला.
=========================

मराठी शायरी मैत्री

“मित्रत्वाची शायरी
मित्रता हे एक मोठे नाते आहे,
ज्याचे मूल्य मोजवेल ते मोजू शकत नाही.
मित्रता हे एक विश्वासाचे नाते आहे,
ज्यावर विश्वास ठेवता येतो.”

दोस्ती शायरी मराठी डाऊनलोड

“मित्रता हे एक प्रेमाचे नाते आहे,
ज्याचे मूल्य अमूल्य आहे.
मित्रता हे एक आनंदाचे नाते आहे,
ज्याने जीवन सुंदर बनवले आहे.”

दोस्ती शायरी मराठी attitude
अर्थ :-
“मित्रता ही मानवी जीवनातील एक महत्त्वाची बाब आहे.
मित्र आपल्याला आनंद, आधार आणि प्रेम देतात.
ते आपल्या आयुष्यात एक महत्त्वाची भूमिका बजावतात.”

मैत्री शायरी मराठी photo

“निसर्गाची शायरी
निसर्ग हे एक सुंदर चमत्कार आहे,
ज्याचे सौंदर्य जगभरातील लोकांना मोहित करते.
निसर्ग हे एक अमर्याद शक्ती आहे,
ज्याने जगाला निर्माण केले आहे.”

“निसर्ग हे एक अशी शक्ती आहे जी जीवनाला समर्थन देते,
निसर्ग हे एक अशी शक्ती आहे जी जीवनाला आकार देते.
निसर्ग हे एक अशी शक्ती आहे जी जीवनाला अर्थ देते.”

अर्थ :-
“निसर्ग हे एक असे चमत्कार आहे ज्याचे सौंदर्य आणि शक्ती आपल्याला मंत्रमुग्ध करते.
ते आपल्याला जीवनाच्या वास्तविकतेची आठवण करून देते, आणि आपल्याला आशा आणि आनंद देते.”

“सुख आणि
दुख दोन्हीही भेटतं जिच्यापासून,
अशी कोणती गोष्ट असते
आयुष्यात आपल्या सांगा बरं.”

मी माझ्या चांगुलपणा बद्दल यासाठी,
कुणाला सांगत नाही.
कारण, कुणाच्या तरी नजरेत मी,
आजही वाईट आहे.

“माणसाचं जर बोलणं,
सुंदर असेल ना,
तर त्याच्या,
रंग रूपाला महत्व राहतं नाही.”

आपण अपमानीत सुद्धा
आपल्याच माणसांकडून होतो.

जेव्हा समोरचा दूर जाण्याचा,
निर्णय घेतो,
तेव्हा तो आपण स्विकारायचा असतो.
त्याला बांधून ठेवायचं नसतं.
त्याला आपल्यासोबत,
त्याच भविष्य दिसत नसेल,
त्याच मन बदलेलं असेल,
वैगरे काहीही कारणं असु द्या.
आपण त्याच्या,
ज्या मनावर
प्रेम केलं होत,
ते आता बदलेलं आहे,
हे आपल्या मनाला समजायला हवं.
त्याला बांधून ठेवलं तर तो,
पुर्वी सारखा भासणार नाही.
म्हणून त्याला जाऊ देणं योग्य आहे.

स्वतःला होणा-या त्रासामुळे,
इतरांना दोष द्यायचा नाही.
त्याने आणखी त्रास होतो.
स्वतःला बदलण्याचा
प्रयत्न करायचा.
भावनांवर नियंत्रण
ठेवायला बघायचं.
हे जमलं की,
त्रास कमी होत जातो.

“आयुष्यात सगळं सुरळीत होत नाही,
जे होत आहे,
तेच योग्य आहे,
याची सवय होऊन जाते.”

“फराह तू आहेस सगळ्यांची जान,
तू दिसतेस खूप छान,
तुझा आम्हाला वाटतो खूप अभिमान.”

Marathi Shayari

योग्य वेळेत योग्य कामे केली की त्यावरून कर्तुत्वाचा अंदाज बांधता येतो.
अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो.
अडचणीच्या काळात मूर्खांलापण मान द्यावा लागतो.

Nice Marathi Status

एकदा अपयश आलं काही करताना,
तर पुन्हा एकदा प्रयत्न करत जा.
कारण दुस-यांदा प्रयत्ना बरोबर,
अनुभव सुद्धा असतो.
म्हणून जिंकण्याची शक्यता वाढते.

Marathi Shayari

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसान कारक ठरतो.
कितीही लपून केलेले काम असो शेवटी ते नजरेसमोर येताच.
क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही.

एखाद्या गोष्टीचा जास्त उहापोह केला तर ती गोष्ट हास्यास्पद ठरते.
गरजू माणूस कोणत्याही अटी स्वीकारून काम करतो.
सारे ऐश्वर्या गेले आणि आता फक्त आठवणी राहिल्या.

“ज्याच्या विषयी गैरसमज झाला आहे,
त्याच्याशीच त्या विषयावर बोलावं लागतं.
इतर कुणाशी त्याच्या विषयी बोललं तर,
गैरसमज तर वाढतोच,
आणि त्या बरोबर संशयही जन्मतो.”

marathi shayari

बोलण्यात नम्रपणा, वागण्यात प्रामाणिकपणा,
राहण्यात साधेपणा, असला की,
आपलं दिसणं महत्वाच राहतं नाही.
माणसं प्रेमाने, माणुसकीने जवळ येतात.
आणि नाती जोडतात.

मराठी शायरी प्रेमाची

जी व्यक्ती आपल्या सोबत राहूणही,
कधी आपली झाली नाही,
तिच्या दूर जाण्याने,
त्रास करून घ्यायचा नाही.

“विनाकारण दुसरयांना त्रास देणे,
म्हणजे ‘विकार’,
आणि त्रास होणारयाला सांभाळून घेणे,
म्हणजे ‘संस्कार’.”

मराठी शायरी attitude

परिस्थितीची जाणीव असली कि,
सहनशक्ती आपोआप जन्म घेते.

रुबाब शायरी मराठी

“जिच्या विरहानेही मी बहरलोय,
ती पारिजातका पेक्षाही सुगंधी असेल.”

marathi shayari

समोरच्याला समजणं,
कठीण झालं की,
त्याच्या बद्दल गैरसमज होण,
चालू होतं.

ज्या लोकांना आपल्या वेळेची किंमत नाही,
आणि, भावनांची कदर नाही ना.
त्यांच्याशी संबंध ठेवला की,
फक्त चिडचिड आणि,
पश्चातापच वाट्याला येतो.
अस वाटत की आपण,
अश्या लोकांसाठी, वेळ वाया घालवतो,
ज्यांना आपल्या सोबतीची गरज नाही.

“आपल्या सगळ्यात एक वेगळेपण असतं.
आपण ते वेगळेपण ओळखून,
आपली जगासमोर ओळख निर्माण करायची असते.
कुणीतरी आवडत म्हणून,
त्याच्या आवडी निवडी स्विकारून,
त्याच्या सारख होण्याच्या नादात,
आपलं वेगळपण हरवून बसायचं नसतं.”

आयुष्यात येणा-या अडचणींपेक्षा,
मनात असलेल्या भावनांचा गोंधळ,
मनाला जास्त खच्ची करतो.
म्हणून मनाचा गोंधळ,
कसा शांत करता येईल हे बघा.
आपोआप आयुष्यातील अडचणी,
दूर करण्याचा मार्ग सापडेल.

बरं, आता जर,
हळू हळू तू माझ्यावर प्रेम करणे थांबवलेस,
तर मी तुझ्यावर प्रेम करणे सोडून देईन.
हळू हळू, जर अचानक तू मला विसरलास,
तर मला शोधू नकोस,
मी तुला आधीच विसरले असेल.!

सोबत राहील्यावर नाही.
तर दूर गेल्यावर समजत,
कुणाला कुणाची गरज किती आहे.

“मानवाचा राक्षस होणे ही त्याची हार,
मानवाचा महामानव होणे हा त्याचा चमत्कार,
आणि मानवाचा चांगला माणूस होणे,
हे त्याचे चांगले कर्म.”

कोणालाही न दुखवता जगणे,
याच्या इतके अतिसुंदर कर्म,
जगात दुसरे कोणतेच नाही,
आणि ज्याला हे कळले,
त्याला वेगळे पुण्य कमवायची गरज राहत नाही.

किती पण जीवाचा आटापिटा करा,
कोणीच कुणाच नसतं,
हेच आयुष्यातल अंतिम सत्य आहे.

विचार आणि माणसाचं कसं असतं,
विचार आपल्या मना सारखे असले की सुख,
आणि मना प्रमाणे नाही घडले की दुःख,
विचार आपली दाखवत नाहीत चूक,
मनात मात्र रहाते रूख रूख..

आयुष्यातील कुठलाच आणि कोणाचाच प्रवास सोपा नसतो,
म्हणून कधीच कोणाच्या आयुष्याची स्वतःशी तुलना करू नका,
कारण ज्याला ठेच लागते त्यालाच त्याच्या वेदना माहीत असतात,
आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगा,
लोकांसारखं जगायला जाऊ नका.

आपल्यात लपलेले परके लोक,
आणि परक्यात लपलेले आपले लोकं,
जर तुम्हाला ओळखता आले तर,
तुमच्या आयुष्यात वाईट दिवस,
बघण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही.

माणसाच्या बाबतीत परमेश्वर कमालीच्या दयाळूपणाने वागलाय,
जन्माची चाहूल तो नऊ महिने अगोदर देतो,
पण मृत्यूच येण मात्र अकस्मात असत,
कारण त्याला माहितीय,
माणूस सुखाची वाट पाहू शकतो,
दुःख येणार हे मात्र पचवू शकत नाही.

प्रत्येक वेळेला पैसा मिळवण्यासाठी धडपडायच नसतं.
काही वेळेला जिवाभावाची माणसं मिळवण्यासाठीही धडपडायच असतं.

साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे.
क्षमा ही परम शक्ती आहे.
नम्रता हा सर्वोत्तम युक्तीवाद आहे.
आणि ओळख हा चांगला संबंध आहे.
फार कमावून गमावण्यापेक्षा,
मोजके कमावून जतन करणे,
फारच महत्वाचे आहे.
मग तो पैसा असो की माणसे…!!

जीवनाला श्रीमंतीचा साज असावा,
पण त्यात संपत्तीचा माज नसावा,
कारण तुम्ही सृष्टीचे पाहुणे आहात, मालक नाही.
पाहुणचार संपला की, कळणारसुद्धा नाही,
स्वतःची राख झाली की, माती.

Marathi Shayari Pics

Marathi Shayari


आठवणी ह्या काहीशा,
खोडकरचं असतात,
त्या येतात तेव्हा,
गर्दीत ही एकाकी करतात,
आणि जेव्हा एकाकी असतो,
तेव्हा गर्दी करतात …….!

फक्त स्वतःचा विचार करणारे लोकं,
फार थोड्या काळासाठी प्रगती करतात,
पण जे सगळ्यांचा विचार करतात,
त्यांची प्रगती कायम होत राहते.

ज्या लोकांना आपल्या माणसांना,
वेळ देण जमतं नाही,
एकतर त्यांचे अनेकांशी संबंध,
असू शकतात.
नाहीतर ते कामा पुरते
संबंध ठेवत असतात.

समोरच्याची काळजी करणं सोडून द्या.
चिडचिण होणं कमी होईल.
ज्याला त्याला ज्याच त्याच,
चांगल वाईट कश्यात आहे,
हे समजतं.
ज्यांना नाही समजतं,
ते अनुभवातून समजून जातात.

स्वाभिमानाला महत्व द्याव माणसाने,
गरजांच्या पुर्ततेसाठी,
कुणासोबत लाचार होऊन राहू नये.

पंखांमध्ये बळ आल्यावर प्रत्येक पाखराने,
आभाळात नक्की उड़ाव,
पण ज्या घरट्याने आपल्याला आश्रय दिला,
ते घरटं कधी विसरू नये.

marathi shayari


तिच्यावर मी खुप प्रेम केले होते,
तेव्हा तीला माझ्या,
प्रेमावर शंका होती,
जेव्हा तीला विश्स्वास झाला माझ्यावर,
तेव्हा मी दुसर्या कोनाचा झालो होतो.

आयुष्यात सगळ्यात मोठी रिस्क लग्न आहे,
नशिबाने चांगला जोडीदार मिळाला तर ठीक,
नाहीतर आयुष्याच्या शेवट पर्यंत,
माणसाला Compromise करावं लागत.

Marathi Shayari Life

माझ्या समोर चालु नकोस,
मी कदाचित अनुसरणार नाही,
माझ्या मागे जाऊ नकोस…
मी कदाचित नेतृत्व करणार नाही,
माझ्या शेजारी चल…माझा मित्र हो.

खरेपणाला जेव्हा
पासून स्पष्टीकरणाची
गरज पडायला लागली,
तेव्हा पासून खोटेपणाला महत्व
येतं गेलं.


कॉलेज मध्ये असताना,
स्वप्न मला दाखवलीस,
आणि कॉलज जीवन संपल्यावर,
दुसऱ्याबरोबर निघून गेलीस.

दु:ख शायरी मराठी,
Sad Shayari Hindi

तुला भेटायला आलो तर,
मला तू दिली कलटी,
अपेक्षा करतो कि तू नाही,
घेत माझी फिरकी.
– Anky.

marathi shayari

रुबाब शायरी मराठी दोस्ती

खोटं बोलणं हे क्रेडिट कार्ड वापरण्यासारखं आहे,
आज तुम्ही खोटं बोलून आनंद घ्याल,
पण नंतर जस क्रेडिट कार्डच बिल भराव लागत,
तसच खोटं बोलल्याची किंमत मोजावी लागते.


आपल्याला जर आपल्या आवडत्या,
व्यक्तीमध्ये वेगळेपणा जाणवला तर,
समजून जा कि ती व्यक्ती काळानुसार बदलत आहे.


Good Morning Quotes Marathi Shayari :-
सकाळी उठल्यावर खूप छान वाटत,
जस काही धुकं आकाशात दाटल्यासारख वाटत,
आठवण येते तिची जेव्हा,
रोज सकाळी चहा पितो तेव्हा.
Shubh Prabhat.

Marathi Shayari Text

मला पाहुन तू, गाल्यात ला गाल्यात हसतेस,
आणि मी बोलल्यावर माझ्यावर पटकन रूसतेस,
पण तुला चॉकलेट दिल्यावर,
पटकन माझ्या कुशीत घुसतेस,
अस कस विचित्र प्रेम तू माझ्यावर करतेस.

marathi shayari
Attitude status in Marathi for Facebook


भूतकाळात झालेल्या चुकांमुळे कुणाला वर्तमानात टोचून बोलू नका.
चुका आपल्या कडूनही झालेल्या असतात,
कुणी सारखं सारखं त्यांची जाणीव करून दिली की,
माहीती आहे ना काय होतं.
आपलं मन भूतकाळात जातं,
पुन्हा त्या चुकांना स्मरत आणि दुख्खी होतं.
निदान हे क्षण ज्याने एकदा भोगलेत त्याची जाणीव पुन्हा त्यांना
होऊन देऊ नका.
चुका होतात तेव्हाच तर माणूस सुधारत जात असतो.
आपणच आपल्या माणसांच्या चुका सुधारायच्या असतात ना की त्याला तो
चुकतोय सारखा हे दाखवायचं असतं.

रुबाब शायरी हिंदी

खूप त्रास होतो,
जेव्हा एखाद्या व्यक्तीची,
आपल्याला सवय लागून जाते,
आणि तीच व्यक्ती आपल्याशी,
हळू हळू बोलायची बंद होते.

मराठी डायलॉग text

काही वेळेस स्वतःला बदलावं लागतं.
कारणं समोरचा,
आपल्या साधेपणाच्या लायकीचा नसतो.

Marathi caption for Instagram for boy attitude


समोरच्याला जितकी गरज असेल,
तेवढी तो तुमच्याशी,
तितक्या जवळीकतेची सोबत ठेवतो.
गरजे व्यतिरिक्त ह्या जगात काहीच नाही.
गरज हीच फक्त,
माणसाला माणसाशी जोडून ठेवते.

Marathi Shayari
Marathi Shayari

जीवनात अपयश येणे चुकीचे नाही,
पण प्रयत्नच न करण हे मात्र चुकीचे आहे.


Birthday Wishes in Marathi For Doctor
डॉक्टर असतात देवासारखे,
ते फक्त माणूस नसतात तर,
डॉक्टर असतात देवमाणूस,
म्हणून डॉक्टरांचा बर्थडे असतो स्पेशल,
हैप्पी बर्थडे डॉक्टर.

{2} Marathi Shayari


फुलाच्या वासाला चोरता येत नाही,
सूर्याच्या किरणांना लपवता येत नाही,
कितीही दूर का असेना आपली माणसं,
पण त्यांची आठवण मात्र विसरता येत नाही.

Happy Birthday Return Wishes in Marathi
तुला विश करायच राहिल म्हणून आलो मी रिटर्न
आणि आता तुला विश करतोय हैप्पी बर्थडे रिटर्न.

Marathi Shayari
Marathi Shayari

प्रेमाची शेर शायरी

डिअर पिल्लू,
आधी तुला गमवायची मनात भीती होती,
पण आता नाही, कारण मी तुझ्यावर कितीही,
प्रेम केला ना तरी तुला त्याची किंमत नाही,
तुला फक्त तुझाच गोष्टी महत्वाच्या आहेत,
तुझा गोष्टीसमोर माझ्या भावना शून्य आहेत,
हे आज समजला मला.

रुबाब शायरी हिंदी

मरण कधी येईल माहित नाही मला,
पण जेव्हा कधी येईल तेव्हा ते,
हृदयाच्या झटक्याने यायला हवं,
शिक्षा तर मिळायला हवी ना प्रेम केल्याची.

रुबाब शायरी मराठी girl

सांज दिखावा,
मेघांची रांगोळी,
गंध केवडा,
धुंद मारवा,
दोघांच्या अंतरी,

ऐल लाजणे,
पैल छेडणे,
बोलक्या लोचनी,
मंद सरींचे,
सूर साजिरे,
देहाला भूलवी,

ऋतू ओघळे,
चिंब जाहले,
स्पर्शता थेंबांनी,
लुब्ध प्रीतीचे,
मुग्ध चांदणे,
शिंपिले अंगणी.
– स्वरा.

Marathi Shayari

स्वतःचे डोळे पुसण्या इतके धीट व्हा,
कारण जीवनामध्ये हसवणारे तर कोणीच नसते,
पण रडवणारे नेहमीच भेटतात.

रुबाब शायरी मराठी love

जेव्हा एखादी व्यक्ती,
आपल्याला खूप आवडते,
तेव्हा प्रत्येक मिनिटाला त्याच,
व्यक्तीचा विचार मनात चालू असतो.

रोज पाहते मी तुझे शब्द…
कधी पुस्तकात जपलेले,
कधी कागदावर टिपलेले,
कधी मनात साठलेले,
कधी ओठात रुळलेले!

दर वेळी वाटतं कळलंय…
अगदी सोप्प आहे,
छान समजलंय,
पण तोच…
पालटू लागतो शब्दांचा अर्थ !

कल्पिताचा थांग सापडत नाही,
विचारांचे शिखर सर होत नाही,
समांतर असं काही गवसत नाही,
सगळं गाठल्याचा नुसता भास…
साध्य मात्र काहीच होत नाही !

तुझे शब्द पुढे जात राहतात,
प्रवाहात उलट सुलट वाहतात,
नवे विस्तार प्रस्थापितात,
मी मागे पळत राहते नेटाने, हट्टाने…
तुझ्या शब्दखुणा खेळवत राहतात !

मग खेळता खेळताच मर्म गवसते,
अन मी उन्मुक्त स्वैर विहरते,
मनी आनंदी आनंद लहरते,
तुझ्या शब्दांचे पैलू “वैभव”…
असे रोज नव्याने उलगडते !
– स्वरा.

Marathi Shayari

एकदा जीव लावणारी व्यक्ती भेटली,
कि दुसरीकडे कुठेच मन लागत नाही.

एक बोलू का,
आजकालच्या प्रेमामध्ये अस होत आहे,
तुम्ही ज्या व्यक्ती साठी रडत आहात,
ती व्यक्ती दुसऱ्यांना खुश ठेवणासाठी व्यस्त आहे.

वास्तवाचा स्वीकार करून,
जगण्याचा खरा आनंद आहे,
बाकीचा सगळा जगासाठी,
मांडलेला दिखावा असतो.

धुंद रातीला खुले चांदवा,
सप्तरंग मावळले,
रंग प्रीतीचा श्वेत सावळा,
अंतरंग उजळले.
– स्वरा.


अधीर मनाच्या अंगणी, ये ना जरा,
पहाट स्वप्न होऊनी, ये ना जरा!

रवी किरण लेवूनी, ये ना जरा,
उधळू रक्तीमा वनी, ये ना जरा!

श्रावण सरी ओंजळी, घे ना जरा,
चिंब सांज आठवणी, दे ना जरा!

धुंद रातीचा चंद्रमा, हो ना जरा,
शाश्वत आस उद्याची, दे ना जरा!

काळ प्रहर विसरुनी, ये ना जरा,
कवेत प्रीतीच्या संयमी, घे ना जरा!
– स्वरा.

Marathi Shayari

संपुर्ण जग प्रेमळ होईल, असे प्रेम करा,
कारण मनुष्यजन्म फ़क्त एकदाच आहे,
जीवनात पैसा कधीही मिळवता येतो,
पण, निघून गेलेली वेळ,
आणि व्यक्ती पुन्हा मिळवता येत नाही.

नात्याला मायेचा ओलावा मिळाला,
तरच ते बहरते, आणि खुप काळ टिकून राहते.

काळजी घेत जा स्वतःची,
कारण या छोट्याश्या आयुष्यात,
खूप स्पेशल आहेस तू माझ्यासाठी.

Marathi Shayari

अबोल राहून गैरसमज निर्माण होतात,
बोलून भांडणं झाले तरी चालेल,
निदान समोरच्याला समजेल तरी,
आपल्या मनात काय आहे.
आणि त्याच्याही मनात काय आहे,
हे आपल्याला समजेल..!!

{3} Marathi Status

किंमत करा त्यांची,
जे तुमच्यावर निःस्वार्थीपणे प्रेम करतात,
कारण जगात काळजी घेणारे कमी,
आणि त्रास देणारेच जास्त असतात.

वेळ आली तर स्वतःची स्वप्न तोडा,
पण जवळची माणसं तोडू नका,
कारण स्वप्न परत येतात,
पण माणसं परत कधीच येत नाही.

जीवनात दोन गोष्टी,
वाया जाऊ देऊ नका,
एक अन्नाचा कण,
आणि दुसरा आनंदाचा क्षण.

Marathi Shayari

स्वभाव आणि विचार चांगले ठेवावेत,
डीपी आणि स्टेटस तर सगळेच ठेवतात.

चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं,
त्यांची आठवण काढावी लागत नाही,
ते कायम आठवणीतच राहतात,
तुमच्यासारखे…….

दुसऱ्याच मन दुखवून,
मिळवलेले सुख,
कधीच आयुष्य,
सुंदर बनवू शकत नाही.

तुझ्यान्तंर विनाकारण,
या देहाला जगवले मी,
आता हो स्वतःच्या हाकेने,
मृत्युला बोलावले मी,
उगाच तुला त्रास,
नको माझ्या जाण्या नतंरही,
म्हनुन त्या स्मशांनाजवळ,
घर बनवले मी.
तुझ्या विरहांत उगाचच
शब्दांना सतवले मी…
तुझा इतिहास
लिहिताना कवितांना रडवले मी
तुझ्यामुळे त्यानांही आसवात
भिजाव लागत
म्हणुन सारे अश्रुं आता मनात
साठवले मी .

Marathi Shayari

माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू,
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू,
काय सांगू कोण आहेस तू,
फक्त हा देह माझा आहे,
त्यातील जीव आहेस तू .

सगळ्यांना आनंदी ठेवण्याच्या नादात,
कधी कधी आपलीच किंमत शून्य होऊन जाते.

Marathi Love Shayari For Girlfriend
अपमान होऊन पण आपण,
त्या व्यक्तीशी स्वतःहून बोलायला जातो,
यालाच खरं प्रेम म्हणतात.

Marathi Shayari

कधीच चांगल्या व्यक्तीची परीक्षा घेऊ नका,
कारण त्यांना झालेला त्रास ते बोलून नाही दाखवत,
व ते तुमच्या आनंदासाठी शांतपणे,
तुमच्या आयुष्यातून निघून जातात.

{4} मराठी शायरी नवीन

मेसेज कधी, कसा येतो,
काय येतो हे महत्वाचे नाही
तर येतो हे महत्वाचे आहे.

स्वावलंबन करून, स्वकष्टार्जित,
तसेच नेकीने व प्रामाणिकपणे,
प्रयत्न करून कमावलेले धन,
निःसंशय सुख-समाधानकारक असते,
आणि जोडीस जोड परधनाची,
लालसा न ठेवल्यास अधिक उत्तम जीवन लाभते.

एकांतात फ़क्त वाईट विचार येत नाहीत,
तर चांगल्या चांगल्या प्रश्नांची सुद्धा उत्तर मिळतात,
स्वताला स्वताची ओळख होण्याची तीच एक वेळ असते.

Marathi Shayari

शब्द कितीही काळजीपूर्वक,
वापरले तरी,
ऐकणारा आपल्या सोयीप्रमाणे,
त्याचा अर्थ लावत असतो.

मनात काय आहे ते स्पष्ट बोलावे,
न बोलता, अंतर निर्माण होण्यापेक्षा,
बोलून निर्णय घेणं कधीही चांगले.

Successful माणूस तोच होतो,
ज्याच्यावर शत्रूने लिंबू फेकले तरी,
तो त्याचे सरबत करून पितो..!!

काही प्रश्नांची उत्तरे फक्त वेळच देऊ शकते.

मला पाहिजे तशी परी आहेस तू,
Life Time मला तुझा गर्व होईल,
अशी माझी जान आहेस तू.
– Ankush.

बंद दुकानाच्या शटर वर लिहील होत..
ऑन लाईन ऑर्डर साठी खालील नंबरवर फोन करा..
फोन केला तर सांगण्यात आल..
शटर वर करा आणि आत या.

देव जे करतो,
ते विचारपूर्वक करतो..
आता हेच बघा ना,
कान एवढे बाहेर नसते तर,
आता मास्क लावण्यासाठी,
खिळे ठोकावे लागले असते.

What is Marathi Shayari?

Marathi Shayari is a Short Poem in Marathi Language. Maharashtra People Read Marathi Shayari.

एखाद्या दीड शाहण्या व्यक्तीला,
उत्तर देत बसण्यापेक्षा,
पुढे निघून जा,
मगच त्याला त्याची लायकी समजेल.

आजकाल लोकांचा वेळ,
ओळख नसलेल्या लोकांना impress करण्यात,
आणि ओळखीच्या लोकांना ignore करण्यात जातोय.

चांगलेपणा, आपलेपणा सगळ्या गोष्टीतून दिसला पाहिजे,
नाहीतर फक्त देखावा कराल तर,
समोरच्याला ते कधीतरी समजेलच.

“तुमच्या नशिबात प्रचंड मोठा समुद्र आहे,
पण तुमचा स्वभाव कचऱ्यासारखा असेल,
तर समुद्र तुम्हाला किनाऱ्यावर नक्की फेकणार.”

“एकवेळ कपडे फाटले तर शिवता येतात,
पण आयुष्याचा जोडीदार फाटक्या कपड्यांसारखा असेल तर,
तुमच्या आयुष्याच्या चिंद्या झाल्याचं म्हणून समजा.”

“दुर्बळ मनुष्य,
बलवान व्यक्ती वर,
सरळ हल्ला न करता,
छोटी खोडी काढून पसार होतो.”

“अपयश मरणापेक्षा भयंकर आहे,
व लाजीरवाणे आहे.”

DMCA.com Protection Status
Scroll to Top